सुसेरी हे गाव (जि. रत्नगिरी) पासून 11-12 कि.मी. अंतरावर असून त्या ठिकाणी अभ्यंकरांची वस्ती अंदाजे सन 1825 पासून असावी. त्या ठिकाणाहून क्षेत्र परशुराम व चिपळूण, मुंबई, नागपूर येथे स्थलांतर करीत वंशज गेल्याचे आढळते. तथापि अपु-या माहितीमुळे निश्चित काल व कुठून अभ्यंकरांची वस्ती मूळ सुसेरी येथे आली, त्याची माहिती मिळू शकली नाही. तथापि उपलब्ध माहितीच्या आधारे कुलवृत्तांतात वंशावळी व व्यक्तिपरिचय देण्यात आला आहे.